Sunday, January 9, 2011

पत्रकारांचा सामना !

कामगारांची एवढी मोठी बलाढ्य युनियन चालवणा-या किरण पावसकर यांना शिवसेना सोडावी लागली. पावसकर यांना कामगारांचे राजकारण कळले, पण त्याच पावसकरांनी सामना या सेनेचे मुखपत्र असलेल्या कार्यालयातील काम करणा-या कामगार आणि कर्मचा-यांकडून थोडेफार जरी धडे घेतले असते तर तर त्यांना शिवसेना सोडावी लागली नसती....आमचे हे वाक्य पत्रकारीतेत असलेला आणि सामनाचे ऑफीस माहित असणारा कोणीही सुज्ञ पत्रकार खोडून काढू शकणार नाही. किंबहुना हे वाक्य सामना कार्यालयातील माणसेही मान्य करतील. असो.शिवाजी पार्कला उभे राहून भाषण केल्यासारखे बोलून चालणार नाही म्हणून आम्ही केलेल्या विधानाचे काही दाखलेही आपल्याला देतो.आता हे पहा सुरेंद्र मुळीक... हा माणूस स्वत: न लढता अनेकांना इतक्या वर्षे चांगल्या प्रकारे लढवू शकला. त्यामुळे सामनाच्या कार्यालयात अनेकजण नेते झाले आणि त्यांनी स्वत:ची खाट पाडून घेतली. पण मुळीक हे लढवय्ये नेते म्हणून आजही कार्यालयात आपला आब राखून आहेत. आणि हो ते पत्रकारही आहेत बरे...त्यांच्या बातम्या...हो आम्ही पहिल्या पानावरील बातम्यांविषयीच बोलत आहोत... किती 'अर्थ'पूर्ण असतात... काही अर्थ असल्याशिवाय मुळीक बातम्याच लिहित नाही...हे पहा विद्याधर चिंदरकर... हा या कार्यालयातील सर्वांच्याच हिट लिस्टवरचा माणूस... पण अनेक संकटे आली गेली तरी त्यांनी आपली खुर्ची कशी टिकवली हे शिवसेनेतून गेलेल्या नारायण राणे, गणेश नाईकांपासून छगन भुजबळापर्यंतच्या अनेक नेत्यांना कळले नाही. नारायण राणे यांनी प्रहार हे दैनिक सुरू केल्यानंतर यावर प्रहारमधील हुषार आणि तज्ज्ञांची एक समिती गठीत केली आहे. चिंदरकर यांच्याकडे कोणता फेविकॉल आहे, याचा शोध ही समिती घेत आहे...हे पहा चीफ रिपोर्टर गजानन सावंत... यांचा आदर्श घ्या... चिंदरकरांच्या शब्दाबाहेर जायचे नाही. साहेब म्हणतील तसे वागायचे आणि आपली खुर्ची टिकवायची ही कला त्यांच्या व्यतीरिक्त अन्य कुणाला जमेल का... बातम्या कुरवाळणे म्हणजे काय हेही त्यांच्याकडूनच शिकावं म्हणे... रात्री बारापर्यंत ते पानांचा पसारा कुरवाळंत बसतात... आता सगळ्यांबद्दल इथे सांगणे शक्य नाही कारण जागेची कमतरता आहे... आणि माणसं जास्त आहेत. म्हणजे सामनामध्ये छापून येणाèया बातम्या आणि पानं यांचा जरी ताळमेळ घातलात तरी माणस जास्त सापडतील... यामध्ये संजय राऊत यांचा निराधाराना आधार देण्याचा जो दयाळू प्रयत्न आहे, त्यातून ही निराधार योजना उभी राहिली आहे. नाहीतर इतकी माणसं इथे कशी सापडली असती... अजून बरीच आहेत. माधव डोळे... उन्मेश गुजराथी वगैरे वगैरे...विशेष म्हणजे ही सगळी कोकणी माणसं
किंवा
... कोकणातून आली. परळ डेपोत उतरली की त्यांना पहिल्यांदा सामनाचे ऑफीस दिसते. मग बिचा-यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. परवा महाराष्ट्र टाइम्समध्ये खेळ विभागात बातम्यांशी खेळ करणाèया एक गृहस्थांनाही सामनाने आपल्या विशाल पोटात सामावून घेतले. कारण ते परब आहेत म्हणून. ज्या कोकणाने शिवसेनेला रसद...ताकद दिली त्या कोकणातील माणसांना मुंबईत सामनाने हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल ही माणसं केवढी ऋणी वगैरे आहेत, पण निवडणूक आली की झाडून मनसेला मतदान करतात. म्हणजे किती गोष्टी पावसकरांसारख्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत... बाळा नांदगावकर स्नेहल जाधव यांना जे जमले, त्याचे धडे मात्र त्यांनी याच सामनाच्या कार्यालयातून घेतले असावेत.... जय महाराष्ट्र !!!