गेल्या वर्ष भरापासून प्रामख्याने मराठी मीडियातील बारीकसारीक घडामोडी पत्रकारांपर्यंत पोहोचवणाèया बातमीदार ब्लॉगचे झाले तरी काय, अशा प्रश्नाने सध्या तमाम मराठी पत्रकारांना ग्रासले आहे. दिवसभर कुठल्या ना कुठल्या बीटवरील आतल्या गोटातल्या बातम्या काढत qहडणाèया श्रमजीवी पत्रकारांना संध्याकाळी कार्यालयात आल्यावर गॉसिपपूर्ण विश्रांतीचा हा एक चांगला कट्टा तयार झाला होता. सर्व घडामोडी अगदी व्यवस्थित सर्वांना समजायच्या...पण अचानक एकेदिवशी हा ब्लॉग गायब झाला आणि तमाम पत्रविश्वात यावर चर्चा सुरू झाली...
हा ब्लॉग का बंद झाला असावा, या संदर्भात आम्हाला कळलेल्या दोन गावगप्पा अशा की,
१) गेल्या तीन आठवड्यांपासून बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथील पत्रकारांची खासियत या ब्लॉगने उघडी केल्याने कुणीतरी ठाणे पोलिसांच्या सायबर टीममध्ये आपले वजन वापरून हा ब्लॉग बंद केला.
२) दुखावलेल्या पत्रकारांच्या समुहाने संगणकतज्ज्ञांच्या मदतीने हा ब्लॉग हॅक केला.
...काहीही असो. एक चांगला ब्लॉग बंद झाला याची खंत मात्र आहे.
- रिपोर्टर